4.23.2006

जोगिया ....

ती जोगिण दुस-याची
तो जोगिया तिचा,
आयुष्याच्या लपंडावात
पराभव मात्र नेहमिच त्याचा ...

असतील कमी स्वत:त काही
समजावतो तो मनाला,
हरल्याचं शल्य मात्र
टोचतंय त्याला क्षणा क्षणाला ....

आयुष्याच्या ऎन मध्यावर
थबकला तो काही क्षण,
विसरून जाईल सारं काही
केला असा मनाशी पण ...

पण केला तर खरा
पण पूर्ण काही होईना,
तिची आठवण आल्याखेरीज
त्याचा एक दिवस जाईना ...

आता असंच कुढंत खुपत
ईथुन पुढे तो जगत रहाणार,
केवळ श्वास चालू आहेत म्हणून
जीवन त्याला म्हणत रहाणार .....


~ ह्र षि के श

4.19.2006

हरवलंय सारं ....

हरवलंय सारं, जे अनुभवलं होतं कधी..
आता आहेत केवळ आठवणीं,
काही कडू काही गोड ...

आठवतात अजून ते
आजीच्या हातचे दहिपोहे,
घुमतात आजुनही कानात
देवघरातले आजोबांचे दोहे ...

दरवळतो आहे अजून हवेत
बागेतल्या त्या पहिल्या मोग-याचा सुगंध,
पावसात चींब भिजलेल्या धरेचा
तो सुखावणारा परिमल मंद ...

आंबले आहेत दात अजून
त्या हिरव्याकंच कैरिने,
भिजून शहारलंय मन आतुर
श्रावणातल्या त्या पहिल्या सरीने ...

कुठे गेल्या त्या संध्याकाळच्या
शुभंकरोति अन रामरक्षा,
हरवला का तो वासुदेव
अन त्याला दिलेली भिक्षा ...

पण खात्री आहे मला,
सापडतील सगळ्या गोष्टी हरवलेल्या ...
तो आजीचा हस्तस्पर्श, ते दहिपोहे, देवघरातले दोहे, त्या टवटवीत मोग-याचा गंध ...

परत घेवून जाईल मला तोच दरवळणारा मॄदगंध
माझ्या हरवलेल्या घराच्या दिशेने ....

~ ह्र षि के श

4.08.2006

२००३ चे सीमोलंघन ...

आई आई ग ... काही नही जरा कळ आली......
नाक्की कुठुन आली ते मला पण नही कळत आहे पण अधुन मधुन अशा कळा येत अहेत वा तसें भास होताहेत! असो ..

तर या शुक्रवारी आम्ही म्हणजे समस्त कळपवासी (२ गवे वगळता) आणि अजुन एक महारष्ट्र मंडळातले होवू घातलेले जोडपे ( मंदार आणि आदिती) असे ८ जण एक ट्रेक ला जायला निघालो ( संत्या आता कळपातला एक गवा झाला आहे ) ... (ता. क. मंदार आणि आदिती आता "Happily Married Couple"आहेत. )

बंगलोरहून रात्री ११ ची बस होती ... त्याने कुक्के-सुब्रमण्यम ला गेलो ... ईथे सकाळची सगळी कामे उरकून देवचे बहेरुनच दर्शन घेउन बशीने एक ठिकाणी आलो ... नाव डोक्याला खूप उन लागल्याने आठवत नही...







ईथून आमची गाडी "TRACK" वर आली ...






नंतर वाटेत अनेक "BRIDGES" आणि "TUNNELS" पार करत करत आम्ही पुढे जात होतो ...






त्यानंतर साधारण ९.३० ला सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले ...
मग जनता खाली बसली ...





(वरील फोटोमध्ये लोकांच्या तोंडावरचे हासू हे ३-३ अंडी, २-२ बन पाव आणि १/२ - १/२ लिटर दूध पिल्यामुळे आहे ... अन्यथा लोकांची अवस्था बघवत नव्हती ..)
खावून झाल्यानंतर आमचा वेग मंदावला नही तर दूणावला ... पुढचे २ Patches मी ,संत्या , निलेश आम्ही लै लै जोरात मारले ... आता सगळे जाणवते आहे ...असो
त्यानंतर थेट जेवण करायला ठेपलो ... ठेपले खाल्ले लोणच्याबरोबर ... दसरा म्हणून "गुलाबजाम" ही होते ... मजा आली ... जेवणानंतर लिचेस मारायचा सामुहिक कार्यक्रम झाला ...नंतर एक फोटोसेशन (होवू घातलेल्या नवरा बायकोचे वेगळे :) )








( बरोबर ओळखले !!! गागावले घातलेला संत्याच आहे)



ह्यानंतर आमच्या ८ लोकत २ गट पडले ...
१) पती, पत्नी और वोह ( शेरपा वा बहाद्दुर )
२) ईतर मंडळी ( बहुतेक सगळी चावरी आणि खौट )
नंतरचा प्रवास जरा कठीण होता. आमच्या Sacks जरी विशेष हलक्या झाल्या होत्या तरी शरीरे जड झाली होती. तरी इतर मंडळी जातच होती. त्यांच्याकडे एकही Torch नव्ह्ता. Tunnels पार करायला ... त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांच्या sacks पकडून एक छोटिशी ५ डब्यांची आगगाडी तयार केली आणि प्रत्येक बोगद्यातून रुळावरून घसरवली ... ( गडी DERAIL झाली नाही तरी एक डबा मात्र झोकांड्या खात होता)


(Engine आणि Engine Driver !!)




आता आमच्या म्हणजे इतर मंडळी आणि गट १ यांचा असा गैरसमज होता की आपण बोगदा क्रमांक २५ ओलांडला की आलो "येडकुमेरी" ला ... पण अखेर एका बोगद्यात आमचे डोळे उघडले ... लख्ख प्रकाश पडला .. बोगद्यात नही आमच्या डोक्यात .. आणि असे कळाले की अजुन १० बोगदे पार करायचे आहेत ... इथून पुढचा प्रवास अवर्णनीय आहे ... तो केवळ अनुभवला तरच त्याची मजा कळेल .. आम्हाला खूप मजा आली काय रे मुलान्नो आली ना?
आता प्रेत्येक बोगद्याच्या टोकाला दरडी आणि झाडे कोसळलेली असायची ... त्यातच एक आपट्याचे झाड होते .. त्याची शुष्क पाने एकमेकांच्या तोंडाला पुसून I mean त्यांनी एकमेकांच्या तोंडाचा घाम पुसून आम्ही "दसरा साजरा" केला ...


( संतोषच्या तोंडावर Flash पडल्याने तो इतका गोरा दिसतो आहे !)










२ बोगद्यांच्या मध्ये काही अत्यंत विहंगम द्रुश्ये दिसली ...




























एक बोगदा बायपास करता करता आम्ही "ब्रिजसपाटीपासून" इतक्या खाली आलो की आचानक वर पाहिले तर २०० फुटांवर ब्रिज होता. मग काय सरळ एका ओहोळाच्या कडेकडेने वर चढलो ... य मजा आली आणि तितकीच फाटली ... आत येडकुमेरीचा सुर्व्या डुबल्यागत झाला होता ... त्यामुळे अजुन एक काळजी ... अंधाराच्या आत कहीही करुन सगळे ब्रिजेस आणि टनेल्स पार करायचे होते. नाही तर ... ? नको रे बाबा .....
पण शेवटी साडे ६ ला आम्ही ईष्ट स्थळी जाऊन पोहोचलो ( ३० कि.मि. चा पहिला टप्पा संपला)
तिथे गट १, १०-१५ मिनिटांपूर्वी येऊन पोहोचला होता. आमचा जीव भांड्यात पडला ... मग यथावकाश पायांवरच्या लिचा काढण्याचा कार्यक्रम झाला. हात, पाय, तोंड धून स्वच्छ झालो. थंडी वाजू लागली होती. पावसात भिजून ओले झालेले कपडे बदलले आणि चुलिवर पाणी तापवून कप-नुडल्स खाल्ल्या. शरिराचे सगळे भाग ठणकंत होते. मग कही जण पेन किलर्स घेऊन झोपले तर काही हमम....... थंडी वाजू नये म्हणून औषध ..
त्यानंतर कुमार संतोषला रात्री अचानक बाहेर जावे लागले ... त्यावेळी त्याने चपला उलट्या घातल्या होत्या ... असो ... औषधाचा परिणाम असावा हे जाणकार लोकांन्ना पटकन समजलं असेलंच ...सकाळी चुलिवर झकास पोहे आणि चहा केला ...





( संतोषचा चेहरा नही तरी डोळे बरेच काही संगून जात होते )








नदी पार करता येणार नही हे कळल्यामुळे आता अजुन किमान १५ तय १६ कि.मि. चालायचे होते.मग सगळे आवरून १०.३० ला निघालो...













उठंत बसत कसे तरी एकदाचे १५ टनेल्स पार केले आणि एका जागी येऊन विसावलो...






( दुधाची बाटली (पिशवी) तोंडाला लावलेला मंदूबाळ )





नंतर इथून ३ कि.मि. वर एकदाचा डांबरी रस्ता दिसला आणि इतका वेळ धरुन ठेवलेला अश्रुंचा बांध ( बांध कसला नदीच) फुटला. रस्त्यावर आलो न आलो तोच एक ४०७ आला ... त्यात मागे बसुन आम्ही सकलेशपूरला आलो. त्या गाडीत आमच्या बरोबर अनेक मासे पण होते खोक्यात बंद केलेले ... त्यांच वास थोड्या वेळ त्रास देऊन गेला आणि सकाळपासून आपण काय काय खाल्ले आहे याची जाणीव करुन देऊन गेला. मग एका होटेलपाशी उतरून काय मिळेल ते २-२ च्या हिशोबात हाणले...
एक लाल डबा धरून "हसन" नावाच्या गावी आलो ... तिथून सुमो करून घरी रात्री ११.३० ला पोहोचलो ....
गरम पाण्याने आंघोळ केल्यावर आपल्याला नक्की कुठे कुठे ओरखडे उठले आहेत ते कळले ...
असो ...
नंतर खिचडी खाऊन "गादी" वर झोपलो .. कूस बदलताना वेदनेची जणीव होत होती ... तरिही सकाळी उठून हापिसात आलो...
तर अश्याप्रकरे एक अत्यंत जीवघेण ट्रेक आम्ही पूर्ण केल ...
३ चिअर्स टु कळप आणि श्रि. व सौ. मंदू !!!!
हिप हिप हुर्रे!!!!!! हिप हिप हुर्रे!!!!!! हिप हिप हुर्रे!!!!!!


~ ह्र षि के श

4.06.2006

Tanha Dil ...

The other day, "Tanha Dil" sounded very different . For the first time, the meaning of the song hit me fair and square ... It hit me in the heart !! I could relate to each line of the song and the song just took me to the past . So this video is again dedicated to all my frnds, who were (are) there with me on the way of my "Tanha Safar" ... here it is ! Cheers to Shaan for giving this !!



Miss you all,
Hrishya
यथा काष्ठम च काष्ठम च समेयातां महोदधौ |
समेत्या च व्यतीयाताम तद्वद्भूत समागमः ||

4.05.2006

असंच ....

नि:शब्द समुद्र, निश्चल वारा, निष्पर्ण झाडं, कोरडा सूर्य ! सारं सारं काही बदलले आहे ! पूर्वीची ती वाटही हरवली वाटत कुठतरी ... आता पुढे जाऊ तरी कसा ?

अरे या पक्षाच घरटं ही दिसत नाही काहितरी चुकतं आहे !
माझ्या सगळ्या खुणा कोणितरी लपवून ठेवल्या आहेत वाटतं ...

तो दुरवर उडणारा तोच का तो पक्षी?
नाही त्याच्या डोळ्यात नाही आहेत ती स्वप्नं आभाळ पंखांवर पांघरून घेण्याची ! मीच चुकलो आहे वाटतं ...

हे माझं जग नाही ! या समुद्राच्या तोंडावरची सुरकुती पण हलत नाही आहे माला पाहून !
एरवी माझ्या तळपायाला गुदगुल्या करणारी त्याची मुलायम रेती आज चटके देते आहे मला ...

एरवी कानात शीळ घालणारा वारा आज का माझा श्वास गुदमरून टाकतो आहे? या झाडाची तर सावलीच पडत नाही आहे ...कसं शक्य आहे? स्वप्न तर नाही ना हे?

श्वास संपण्याआधी पळावं इथून ... पण कुठे? कोणत्या दिशेला?
हा सूर्य पण कदाचित उत्तरेहून आला असेल वर अला चुकवायला ...

तो वर आकाशात दिसतो आहे तो गणूंच आहे का माझा?
मग हसतो का आहे तो माझ्यावर? हवंय तरी काय त्याला माझ्याकडून?
तो बोलतोय कहितरी ... मग मला का ऎकू येत नाही आहे?

चालत रहायला सांगतो आहे तो मला कदाचित!
कदाचित खुणावत असेल योग्य दिशेकडे!
सांगत आसेल कदचित की हेच आहे माझं प्राक्तन कपाळावर कोरलेलं ....
मी कधी वाचू नं शकलेलं ...

माझ्या हातात आता काय आहे तर फक्त चालत रहणं ...
चटके सोसत, सूर्याबरोबर, त्या पक्षाच्या घरट्याच्या शोधात, अंतापर्यंत .....

~ ह्र षि के श . . .

4.03.2006

Not so perfect Sunday dinner ....

Here's an incident that happened last night ... Me, along with six other friends went to this place called "Aranya" on the external ring road (close to the Silk Board junction)

We ordered Chinese food and were not sure of what was in store for us ... To start with the place was not properly lit! When we asked to lit a candle or 2 on the table, the waiter said they had no candles… I mean that was as rude as it could get! May be they did not want to spoil the "Jungle" effect that they had on the terrace ... Afterall the name of the place was "Aranya"!!

Anyways, we were having fun telling storied and cracking jokes… then came the food! I guess they had dim lighting in the kitchen as well … all I could see was big RED CHILLIES in the Shezwan Fried Rice bowl … it was all RED … and we were kinda drinking water every alternate bite … coz invariably we were chewing on Chilies in the dark … But the food had a good taste!

It was the last bite that I had which made all the difference … Instead of chewing on the Chilly, I chewed on something really hard … when I took it out, I saw that I was chewing on a rusted metal wire … Now I lost it then and there … I called up the attendant and showed him the wire which according to me is not what VEG people have for dinner! Then we called the manager of the hotel to our table, but unfortunately he was not there and so we just blasted the guy who was filling in for him!! Poor fellow listened to all we had to say and agreed to not to take any money from us!! We were kinda lucky in more than one ways!! Firstly that metal part did not enter my throat else it would have been really serious and secondly, we had nice spicy food for free!


All and all quite an eventful Sunday dinner!!

काही मराठी चारोळ्या ....

जीवनावर हसता हसता
एक अश्रू डोळ्यात तरळला,
बरसण्याआधी हा मेघ
गडगडायला कसा विसरला || १ ||

आजकाल तिचे डोळे
माझ्याशी बोलत नाहीत,
त्यांची समजूत कशी काढू
माझे मलांच कळंत नाही || २ ||

कधी कधी खरंच वाटतं
मागावी गणूकडे आईएवढी सोशीकता;
सगळं हसत हसत सहन करण्यासाठी || ३ ||

सवय पडत होती काही गोष्टींची
पण आता सारं काही संपलं आहे;
यातना आहेत काही सवयींच्या
पण त्यांची ही हळू हळू सवय पडेल || ४ || ..... :) आवडलं आपल्याला !!

चालतो आहे एकटांच स्वत:च्या शोधात;
सापडल्यात कही सावल्या, पण एक ही जुळेना || ५ ||

~ ह्र षि के श . . .

When ....

Hi,
Here are some of the lines that I wrote while I was supposedly attending a presentation ( No need to mention a BORING one) at the office ... It is amazing how creative one can get when tortured to the limits ... Anyways, the context was different back then when I wrote these lines ... but surprisingly these lines seem to fit everywhere in my life ... It still continues to amaze me how much I have learned from that PRESENTATION ..!!

So here it goes ....

WHEN .....


Stressed to the core; I lie dead,
With a paining body and a stormed head...

Everyone told me No Pain No Gain,
But all my pains have gone in Vain ...

So I asked the god, coz it's outta my Ken,
If this is gonna end and if yes WHEN ????

Cheers,
Hrishi
Suffering is circumstantial, either it ends or we die ...

4.02.2006

Yaaron Dosti ....

After a loooong time I felt really alone that day ... Something is really missing these days !! We had a group of frnds in Bangalore ...we still have a group but now everyone has gone away in their own directions ... in search of their dreams ... Leaving behind just the memories ... some sweet, some sour ... It was really a dream life that I had in IMC for last 3 yrs ... I or rather we had nothing but FUN in these 3 yrs ... These Videos are dedicated to all my friends who have enriched my life in these best years of my life .....







Miss You All ..
Hrishya
Phir Ussi Rahgujar Par Shaayad ... Hum kabhi mil sake magar Shaayad ...