9.10.2007

जिंकणं जरूरी आहे .....

किती सोपं असतं जर हरण्याची अट नसती ...
केलं ही असतं सगळं मनाच्या तालावर ... अश्क्यातलं काही ... स्वप्नांत पाहिलेलं !!

पण अट कायम होती ... अन हरणं मनात होतं ..
हरल्या मनानं नाही घडल्या काही गोष्टी स्वप्नातल्या ...
राहून गेल्या त्या तश्याच अंधा-या कोप-यात ... चाचपडत ...प्रकाशाची वाट पहात !!

अखेर एक दिवस आला नशिबी त्यांच्या प्रकाशाचा एक किरण ....
पुन्हा जगावंस वाटू लागलं मनाला ... न हरता ... काही जिंकण्यासाठी

जिंकावंस वाटलं स्वत:साठी चार नभांच आपलं म्हणता येईल अस आभाळ ...
जिंकावंस वाटलं आपलंस कोणीतरी .. आभाळ संपेपर्यंत बरोबर असण्यासाठी
जिंकावंस वाटलं आपल्या कोणासाठी तरी ... त्यांच्या जिंकण्यासाठी
जिंकावंस वाटलं आपल्याच अस्तित्वासाठी ... कोणाचं तरी सर्वस्व होण्यासाठी ...
जिंकावंस वाटलं मनातून हरणं काढण्यासाठी ... कारण तिथॆ आता कोणितरी येणार होतं ... आपलंस .. आभाळ संपेपर्यंतच्या सोबतीसाठी !!

~ हृषिकेश

2 comments:

HAREKRISHNAJI said...

आपला बॉग मस्त आहे

परागकण said...

wah re .. kyaa baat hai!
chhaan lihitos ki ... maahit navhata attaparyant. Keep it up!